रक्षाबंधन हा एक पवित्र भारतीय सण आहे, जो भावंडांमधील प्रेमाचे, विश्वासाचे व नात्याचे प्रतीक आहे. विशेषतः बहिण भावाला राखी बांधून त्याच्याकडून संरक्षणाची हमी मागते, आणि भाऊ तिला संरक्षण देण्याची शपथ घेतो.
रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो आणि याचा हिंदू धर्मातील धार्मिक, पौराणिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार मोठा गौरव आहे.
या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये रक्षा बंधन कोणत्या दिवशी येत आहे?
रक्षाबंधन २०२५ – तारीख
रक्षाबंधन शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जाईल.
काही स्रोतांनुसार ८ ऑगस्टचा संध्याकाळचा भाग पुर्णिमेच्या तिथी अंतर्गत येतो.
तथापि, सर्वाधिक अधिकृत पंचांगानुसार ९ ऑगस्ट हा दिवस योग्य असून तोच साजरा केला जातो.
पहाटे घराची साफ सफाई केली जाते. घरात अध्यात्मिक ऊर्जा येऊ दिली जाते. या पवित्र बंधनाच्या सोहळ्यात भाऊ -बहिणीच्या प्रेमाची साक्ष दिली जाते. त्यानंतर...
सण साजरा करण्याचा दिवस: शुभ मुहूर्त
रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला (साधारणतः जुलै-ऑगस्ट दरम्यान) साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, हा एक शुभ मुहूर्त मानला जातो.
रक्षाबंधन २०२५ शुभ मुहूर्त
०९ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ०५:४७ ते दुपारी ०१:२४ पर्यंत आहे.
पंचांग
सूर्योदय: सकाळी ०५:४७
सूर्यास्त: संध्याकाळी ०७:०६
चंद्रोदय: संध्याकाळी ०७:२१
चंद्रोदय: चंद्रास्त नाही
ब्रह्म मुहूर्त: सकाळी ०४:२२ ते सकाळी ०५:०४
रक्षाबंधनची विधि / परंपरा:
पहाटे घराची साफ सफाई केली जाते. घरात अध्यात्मिक ऊर्जा येऊ दिली जाते. या पवित्र बंधनाच्या सोहळ्यात भाऊ -बहिणीच्या प्रेमाची साक्ष दिली जाते. त्यानंतर...
बहिण भावाला ओवाळते – गंध, फुले, अक्षता आणि दिवा लावून.
राखी बांधते – हातात रक्षा सूत्र (राखी) बांधते.
गोडधोड खाऊ घालते – लाडू, पेढे, ई.
भाऊ बहिणीला भेट देतो – पैसे, वस्त्र, दागिने वा अन्य वस्तू.
भाऊ तिला रक्षण व साथ देण्याचे वचन देतो.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व:
"रक्षा" म्हणजे संरक्षण आणि "बंधन" म्हणजे नात्याचे बंधन.
हा केवळ भाऊ-बहिणीपुरता मर्यादित न राहता, संरक्षणाचे वचन देणारा कोणताही संबंध यामध्ये येतो.
राज्य आणि समाज यांच्यातील एकता देखील या सणाद्वारे अधोरेखित होते.
रक्षा बंधन या पवित्र बंधनाला पौराणिक कथा सांगितली जाते.
१. द्रौपदी आणि श्रीकृष्ण:
एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला इजा झाली, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा एक तुकडा फाडून त्याला बांधते. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला संकटात वाचवण्याचे वचन दिले आणि वस्त्रहरणाच्या वेळी ते पूर्णही केले.
२. इंद्र आणि इंद्राणी:
दैत्यांशी युद्ध करताना इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात राखी बांधून त्याच्या विजयासाठी प्रार्थना केली.
३. राणी कर्णावती आणि हुमायून:
राजपूत राणी कर्णावतीने मुघल बादशाह हुमायूनला राखी पाठवून मदतीची याचना केली होती. या वाचनाची पूर्तता करण्यासाठी त्याने तिला मदत करण्याचे वचन दिले.
निष्कर्ष
निष्कर्ष
"रक्षाबंधन" हा फक्त राखीचा सण नाही, तर तो आहे "प्रेम, विश्वास, नात्याचे बंधन आणि कर्तव्याची आठवण देणारा पवित्र दिवस."
ही राखी केवळ दोरा नाही,
ती बहिणीच्या विश्वासाची वीण आहे.
भाऊचं वचन हे केवळ शब्द नाही,
ते आयुष्यभराचं संरक्षण आहे.
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छा:
आपल्या सर्व भाऊ - बहिणींचे आयुष्य.. प्रेम, आनंद आणि सुरक्षिततेने परिपूर्ण होवो.
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हे ब्लॉग्स सुद्धा वाचा
महाशिवरात्रीची महिमा, सुरुवात कधी झाली आणि पूजेची पद्धत
महाकुंभ मेला २०२५ वैशिष्टे : MAHAKUMBH MELA 2025
दिवाळी ( दीपावली ) २०२४ विशेष : लक्ष्मी पूजन, वेळ, तारीख, मुहूर्त
दसरा २०२४ : हिंदू धर्मात दसऱ्याचे महत्व, इतिहस आणि मुहूर्त
विघ्नहर्ता श्री गणपतीचे आगमन २०२४ : दिवस आनंदाचे आणि उत्सवाचे